कुमार राजीव रंजन
(यूपीवाला फ़्रेंड)
● प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
30 सप्टेंबर 2020
----------------------------------------------------
----------------------------------------------------
मैत्री होण्यासाठी वयाचं बंधन नसते तसे काळाचे ही बंधन नसते...
20 वर्ष मित्रांच्या ग्रुपमध्ये सोबत राहून सुद्धा एखाद्याशी मैत्री होऊ शकत नाही ..काही लोक अतिशय अल्पकाळासाठी एकत्र आले तरी सहज व्हेव्हलाईन जूळून जाते. अशीच अल्प काळातील भेट झाली कुमार राजीव रंजनशी.. 20 दिवस आम्ही राणी दुर्गादेवी विश्वविद्यालय , जबलपूर ,मध्यप्रदेश मध्ये समाजशास्त्र रिफ्रेशन साठी भेट झाली होती.
नोव्हेंबर 2009 मध्ये मध्यप्रदेश एकदम गारठलेला असतो मी गेलो तेव्हा 5 डिग्री सेल्सिअस तापमान होत जबलपूर स्टेशनवर ट्रेनमधून उतरल्यानंतर रिक्षात बसल्यानंतर थंडीची चांगलीच जाणीव व्हायला सुरुवात झाली होती…UGC च्या एकॅडेमीक स्टाफच्या रेस्टहाऊसला सकाळीच पोहचलो तर ...मीच पहिला होतो दुसऱ्या दिवशी रिप्रेशर कोर्स सुरू होणार होता ...वॉचमनला सुद्धा माहीत नव्हतं ...बिल्डींग एकदम रामसे बंधूंच्या हॉरर शो सारखी दिसत होती ...एकतर आयुष्यात इतक्या कमी तापमान असलेल्या थंडीचा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो ...त्यात मला कोल्ड ऍलर्जी ...डॉ. मानकर यांच्याकडून हॉमोयोपॅथीच्या गोळ्यांचा डोस घेऊन आलो होतो ...डबीचे बुच काढताना सुद्धा नाकीनऊ आले होते... अंगावरील स्वेटर ...डोक्यावरील कान टोपी पायातील गरम मोजे दिवसभरात फक्त 3 मिनीटांसाठी फक्त आंघोळी साठी काढायचो ...आंघोळ सुद्धा मोठमोठ्याने भसाड्या आवाजात गाणी म्हणत करायची आणि कसेतरी कपडे खालायचे आणि हिटरवर जाऊन बसायचं … माझ्या रूम मध्ये आम्ही तिघे होतो ...माझ्याशिवाय अजून दोनजन मध्यप्रदेशचे होते रामेश्वर (दुर्दैवाने कोरोनाच्या काळात त्याचा मृत्यु झाल्याचं त्याच्या मिसेसनी मेसेज केला होता...बातमी समजल्यावर खुप वाईट वाटले होते ) रामेश्वरला गेल्याच वर्षी त्याच्या वाढदिवशी मी फोन केला होता ...बोलीए डाक्टर साहब ..अशी नेहमी प्रेमाची हाक असायची आणि दुसरा पहाडे ...कायम गुड शांत असायचा ...आणि गायब असायचा ...त्यामुळे त्याच्याशी फार बोलणंच झालं नाही.
समोरच्या रूममध्ये मोठ्या भारदस्त आवाजाचा कोणी तरी रहायला आला होता ...नंतर समजलं यूपीवाला आहे ...2009 लाच राज ठाकरेनी यूपीवाल्या संदर्भात आंदोलन सुरू केलं होतं...मोठे राडे सुरू होते ...महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली तेव्हा मी आवर्जून मनसेचे काम करायचो ऍड.संकेत घाग सारखे सेन्सिटिव्ह लोक लीड करत होते ...माझी राजकीय पार्श्वभूमी असल्याने मी सावधच काम करत होतो …. मनसे मेम्बरशीपची चिट्ठी खिशात होती… यूपीवाले चांगलेच पिसाळलेले होते त्यामुळे समोरच्या प्राध्यापकासोबत सावध रहायचं ठरलं … दुसऱ्यादिवशी अचानक रूममध्ये तो माणूस आला ...सहा फुटाच्या आसपास उंच पुरा धीप्पाड देह असलेला ..असख्लित हिंदी बोलणारा… सर्वांची स्वतःच ओळख करून घेतली माझ्यापर्यंत आला … ओळख सांगितली ...मै रत्नागिरी महाराष्ट्रसे हु….हा तो आपण बालासाहब ठाकरे के महाराष्ट्रसे है ...वा क्या बात है ...मी 38 लोकांमध्ये एकटाच महाराष्ट्र मधून आलो होतो … मी खूप सावध प्रतिसाद दिला ...तोच माझी ओळख करून घेणारा कुमार राजीव रंजन होता …
रिप्रेशर कोर्समधील माझं कोणत्याही विषयावर सडेतोड बोलण्यावर राजीव फिदा होता एकदा असाच कास्ट सिस्टीम वर माझं मत मांडले….ब्रेक मध्ये राजीव जवळ आला बोलला ..तू भी ठाकरे जैसाच बोलता है ..तिथपासून राजीव मला " बालासाहब " च बोलायचा हे लिहिताना सुद्धा त्याचा भारदस्त आवाज कानात ऐकायला येतो ...कैसा है बालासाहब … एव्हढा दिलदार मत व्यक्त केल्यामुळे त्याची यूपीवाले म्हणून जी भीती होती ती कमी झाली …
4 दिवस झाले होते राजीव अचानक रूम मध्ये आला म्हणाला…. चलो जबलपूर मार्केटमे जाएगे ...रामेश्वर सोबतच होता सायकल थ्री सीटर मधून निघालो ...अनेक विषयांवर गप्पा सुरु झाल्या ….एका हॉटेल मध्ये मस्त स्पेशल बिर्याणी खाल्ली आणि परत आलो रस्त्यामधून जाताना मध्ये त्याच्या एव्हढ्या बेधडक वागण्याची भीती वाटायची ...मनात यायचं मराठी म्हणून खोलवर राग असेल तर ….आपलं काही खरं नाही … पण हळूहळू सामाजिक विषयावर चर्चा सुरू झाल्या त्यावेळी कळलं यूपी बिहारी मुळात खुप गरीब आणि कष्टकरी आहेत तेच लोक महाराष्ट्रमध्ये काम करत आहेत. सामाजिक विषमता एव्हढी आहे की कमी जातीच्या महिलांना सामुहिक बलात्कार सारख्या घटनांना सतत सामोरे जावे लागते ...राजीव बोलला की ...ओ लोक महाराष्ट्रमे बहोत सेफ है ...ये पोलिटिकल लोगोंके वजसे ...ना घर के ना घाट है ...ऐसी स्थिती है… तेव्हाच ठरवलं रत्नागिरीत आल्यावर मराठी आंदोलन करणाऱ्या मनसेचे काम करायचे बंद करायचे ...आणि तसे केले सुद्धा ...पूर्वीसुद्धा मी कायमच बोलायचो ...मी नवनिर्माण समर्थक आहे राज ठाकरे समर्थक नाही …
राजीव , रामेश्वर,आणि मी बालाघाट ला फ़िरायला गेलो संगम चित्रपट चित्रित झाला तिथे गेलो….मघ्ये नदी बाजूला संगरवर दगडाचे डोंगर ...अतिशय विलोभनीय दृश्य होते ...तिथे राजीवची अजून दोस्ती झाली ...खूप फोटो काढले ...तिघानाही सीडी मध्ये लगेच देऊन टाकले होते ...गेली 11 वर्ष सतत त्याच्या वाढदिवसला नचूकता फोन करतो ...आम्ही एकमेकाला आपआपल्या ठिकाणी येण्यासाठी आश्वासन देतो ...जाणं अजून झालं नाही पण BHU(बनारस हिंदू युनिव्हर्सिटी) चा विषय आला की नक्की राजीवची आठवण येते ...सहा महिन्यांपूर्वीच बँक ऑफ इंडिया मध्ये चंदनकुमार नावाचे बँक मॅनेजर आले आहेत ...ते केवळ BHU चे आहेत आणि राजीवशी साधर्म्य आहे म्हणून त्यांच्याशीही मस्त मैत्री झाली आहे….
20 वर्षात होऊ शकत नाही इतकी 20 दिवसात मैत्री होऊ शकली आहे ...आणि आजन्म राहणार आहे
आज राजीवचा वाढदिवस आहे ...हॅपी बर्थ डे राजीव