बुधवार, ३१ मार्च, २०२१

डॉ.राजीव सप्रे ..एक अवघड गणित

डॉ.राजीव सप्रे ..एक अवघड गणित


डॉ. आनंद आंबेकर 

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

------------------------------------------------------



राजीव सप्रे म्हणजे एक अवघड गणिती कोडं... कधीच कुणाला कळणार नाही की  सप्रे सर नेमके कसे आहेत.

 मला तर अनेक वेगवेगळ्या रूपा मध्ये.. वेगवेगळ्या भूमिकेमध्ये दिसले ...अनुभवले .

सुरुवात झाली 2004 मध्ये ज्यावेळी ते विज्ञान शाखेचे उपप्राचार्य होते जोगळेकर महाविद्यालय मध्ये पहिल्यांदाच विद्यापीठाच्या स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून एक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. त्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुळात "डेज"असायचे परंतु ते केवळ मनोरंजन हा उद्देश ठेवून केले जायचे परंतु देव सरांनी विश्वास ठेवून विद्यापीठाच्या स्पर्धांचं आयोजन.. नियोजन कसं असतं यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी देव सरांनी मला आठ दिवस ड्युटी लिव्ह देऊन मुंबईचे महोत्सव पाहण्यासाठी पाठवलं ते पाहून आल्यानंतर प्रथमच विद्यापीठाच्या स्पर्धांची तयारी करण्यासाठी एक महोत्सव आयोजित केला त्यासाठी व्यवस्थापन स्पर्धा अशी वेगळी कल्पना माझ्या डोक्यात आली आणि ती सर्वप्रथम सप्रे सरांना सांगितली. त्यांना ती कल्पना इतकी आवडली की त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला सायन्स विभागाचे उपप्राचार्य असताना संपूर्ण सायन्स फॅकल्टी वरती लक्ष दे... प्रॅक्टिकल चे काय प्रॉब्लेम आले तर मी बाकीच्यांना समजवतो आणि खऱ्या अर्थाने सरांच्या काळापासून विज्ञान शाखेचे विद्यार्थी व्यवस्थापन स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धेकडे वळले त्यासाठी मला त्या विद्यार्थ्यांना घेऊन छोटेखानी पिकनिक काढावी लागतील त्यासाठीसुद्धा  सरांनी सपोर्ट केला आणि उदयास आली "महाराजा करंडक व्यवस्थापन स्पर्धा" या गोष्टीला ...या संकल्पनेला आत्ता सतरा वर्षे झाली पण या स्पर्धेचा पहिला पाठिंबा दिला तो  सप्रे सरानी.  स्पर्धा पाहण्यासाठी स्वतः थांबायचे पण सोबत आपली लहान मुलगी सायली जी शाळेत शिकत  होती तिला सुद्धा घेऊन आले होते … आणि सायली कॉलेजमध्ये आल्यानंतर सायलीने स्वतः महाराजा करंडक साठी भाग घेतला होता . यातूनच सरांची व्यवस्थापनाकडे बघण्याची आणि जपण्याची दृष्टी दिसून येते.


दुसरा पाठिंबा असा होता की एका पातळीवरती महाविद्यालय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यशस्वी व्हायला लागले होते अशावेळी त्यांचे मित्र संजय मिस्त्री म्हणजेच सध्याचे महाराष्ट्र कार्टूनिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष 2006- 2007 च्या दरम्यान सप्रे सरांनी त्यांच्याशी बोलणं केलं आणि महाविद्यालयांमध्ये त्यांना आमंत्रण दिलं त्यांच्या येण्याने पुढल्याच वर्षी महाविद्यालयाला कार्टूनिंग मध्ये सर्वप्रथम विद्यापीठाचे मेडल मिळालं 


सरांचं आणखीन एक वेगळे रूप म्हणजे ते स्वतः चांगलं गाण्यासाठी प्रयत्न करत होते स्टाफ वेल्फेअर ची जबाबदारी असल्याने त्यांनी मला एक गाण्याचा प्रोग्राम अरेंज कर म्हणून आवर्जून सांगितलं आणि त्यांनी स्वतः सुद्धा सहभाग घेतला होता त्यावेळेला अनेकांना सप्रे सरांना स्टेजवर  पाहून आश्चर्य वाटलं होतं ...जीपीएल म्हणजेच गोगटे प्रिमियर लीग अशी अफलातून संकल्पना आणून महाविद्यालयातील शिपायापासून प्राचार्य पर्यंत सगळ्यांच्या टीम बनवल्या आणि क्रिकेटच्या मॅच रंगल्या त्याच्यामध्ये सप्रे सरांचा कायमच सक्रिय सहभाग असायचा आणि हा सिनियर माणूस क्रिकेट खेळायला उतरलाय म्हणजे इतर सीनियर आणि आमच्या सारख्या ज्युनियर माणसाला सुद्धा उत्साह वाटायचा.

आणखीन एक अफलातून सरांचे रूप खवय्ये अशी त्यांची ओळख .बापू गवाणकर आणि आम्ही मडक्यातमध्ये शिजवले जाणारे म्हणजे मोंगा/पोपटी पार्टी करण्यासाठी सर स्वतः उत्स्फूर्त सहभाग देतात  वेगळ काहीतरी खाण्यामध्ये त्यांचा कायमच अग्रेसर सहभाग असतो. सगळ्या लोकांना म्हणजे शिपाई ..प्राध्यापक ..क्लार्क.. आमचे बाहेरची मित्र सुद्धा त्यांच्या सोबत एन्जॉय करतात.

 सरांचं संशोधन हा एक आवडीचा विषय माझ्याकडे सायन्स विभागाचे फाउंडेशन कोर्स असल्यामुळे  त्या शाखेचे विद्यार्थी प्रकाशात आणणं माझ्या आवडीचं काम आणि त्या विद्यार्थ्यांना सर आवर्जून आपल्या संशोधन प्रेझेन्टेशन साठी सहभागी करायचे मी आवर्जून सांगायचे की तू दिलेली मुलं मला खूप उपयोगी पडतात ...अगदी इतकच नव्हे तर प्रेझेंटेशन्स  चांगली असणारी कॉमर्स फॅकल्टीची मुस्सरत मुल्ला नावाची मुलगी संशोधनासाठी घेतली आणि तिला सुद्धा राज्यस्तरापर्यंत पारितोषिक मिळवून दिलं... चांगलं काम करण्यासाठी भेदभाव करू नये हा बोध मला त्यांच्याकडूनच मिळाला.

 वैयक्तिक पातळीवर बोलताना त्यांच्यासोबत कधीच परकेपणाचे वाटले नाही कारण ते कायमच मित्राच्या भूमिकेमध्ये असतात आणि आम्हाला कम्फर्टेबल ठेवतात म्हणूनच सरांसारखा ज्येष्ठ परंतु मित्रासारखा सहकारी आज निवृत्त होतोय खरं म्हणजे सर चांगल्या कामासाठी कधीच निवृत्त होऊ शकत नाही... परंतु गोगटे-जोगळेकरच्या व्यवस्थापनातून आज शुभेच्छा घेऊन नवीन कामासाठी नेहमीच अग्रेसर असतील यात काही शंका नाही सरांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा


शुक्रवार, २६ मार्च, २०२१

महेश ..सख्खा पाठीराखा

महेश ..सख्खा पाठीराखा 

(भावांमधील ओलावा असणारं अतूट नातं)

______________________________

डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

25/03/2021


सख्खा भाऊ म्हटलं की भांडणही येतातच ...पण एकमेकाच्या क्षमतेचा आदर करण्याचा आम्हा दोघांचा नैसर्गिक स्वभाव असल्याने लहानपणापासूनच अनेक लुटूपुटूच्या भांडणानंतर सुद्धा आनंद महेश ची जोडी असंच म्हटलं जातं यातच आमच्या दोघांमध्ये अतूट विश्वासाचं नातं आहे हे सर्व नातेवाईकांना नक्की माहित आहे.स्वाभाविकपणे आमच्या दोघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे अगदी दिसण्यापासून  ते अगदी रिलेशन संदर्भातील कल्पने पर्यंत. लहानपणी आम्ही एकत्र क्रिकेट खेळताना आम्हाला एका टीम मध्ये कधीच कुणी सहन केलं नाही जोपर्यंत आनंद आणि महेश विरुद्ध टीम मध्ये राहत नाहीत तोपर्यंत खेळायला मजा  येत नाही हे सर्वच आमच्या आंबेकर मित्रमंडळींना माहिती होतं, .....परंतु एखादा महत्त्वाचा विषय हाताळायचा असे असेल तर सर्वांनाच माहीत होतं आई अण्णा नंतर आनंद महेश हे एक मताने निर्णय घेऊन तो तडीस नेण्याची  नक्कीच जबाबदारी घेतात ...मग तो घरगुती विषय असेल की सार्वजनिक विषय असेल मग आमची एकी  सर्वानाच माहिती आहे.

लहानपणापासून महेश तसा अबोल... जास्त जबाबदारी न घेणारा माझ्या मागेमागे राहणारा असंच सर्वाना माहिती होता पण .. .आज एम एस इ बी मध्ये मॅनेजर पोस्ट आहे ...7000 सदस्य असलेल्या विद्युत कर्मचारी पतसंस्थेचा निवडून आलेला संचालक आहे...बांद्रा ऑफिस कर्मचारी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे.

 अभ्यासा मधील त्याची एकाग्रता माझ्यापेक्षा अफाट होती म्हणूनच सातवी ला स्कॉलरशिप मध्ये आला सातवी मध्ये असताना त्याची आणि माझी फाटाफूट झाली तो माईकडे शिक्षणासाठी गुहागर ला गेला आणि मी एकटाच आंबेडला होतो.. माझ्या दहावीनंतर मी रत्नागिरी मध्ये राहायला गेलो आणि तो आंबेड मध्येच राहून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पण सुट्टी मध्ये परत आमची क्रिकेटची मॅच रंगायची ...ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी रत्नागिरी मध्ये राहिलो आणि महेश नोकरीनिमित्त पनवेल- नंतर मुंबईला गेला तसं पाहिलं तर आमचं एकत्र राहणे फारच कमी होतं. एकमेकांमधील ओढ मात्र अफलातून कायमच राहिली  कालांतराने महेशला रत्नागिरीला बदली करून येणे सहज शक्य होतं परंतु मोठी बहीण बेबी हीच्या सल्ल्यानुसार आम्ही कायम लांब राहावं म्हणजे म्हणजे दोघांमधील असलेलं प्रेम.. आदर ..समजूतदारपणा हा टिकून राहील आणि दोघेही चांगली प्रगती कराल …. आणि तसंच झालं.

यामध्ये तिच्या पत्नीचा म्हणजे पूर्वाचा सुद्धा मोठा वाटा आहे... आमच्या निर्णयात ती कधीच आक्षेप घेत नाही ...की माझी पत्नी सुध्दा ...त्यांना माहीत आहे आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. 

 एक किस्सा आठवती जो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. मी एम ए साठी कोल्हापूरला असताना युनिव्हर्सिटी मध्ये कुलगुरु हटाव मोहिमेमुळे आमची परीक्षा दोन वेळा पुढे गेली... यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी हताश झालो होतो…  माझं तर स्वप्नच मुळी प्राध्यापक होण्याच होतं ..या परीक्षा अनिश्चित असल्यामुळे मलासुद्धा जबरदस्त प्रेशर आलं होतं. आमच्याच रत्नागिरीतील एक मित्र परीक्षेमध्ये प्रेशरमुळे आजारी पडला होता. ही घटना माझ्या डोक्यामध्ये भीती तयार करत होती आणि माझ्याही भविष्याबद्दल प्रचंड भीती वाटू लागली .. लँडलाईनवरुन घरी फोन केला फोनवर महेश होता मला सुचतच नव्हतं इकडची तणावाची परिस्थिती मला पेलवत नव्हती... आणि मी फोन वर रडायला लागलो... मला काय होतंय हे मला सांगता येत नव्हतं फोन ठेवल्यानंतर घरात काय झालं मला माहिती नाही ...पण दुसऱ्या दिवशी महेश कोल्हापूरला आला आणि मला आंबेडला घेऊन गेला.

 मी आठ दिवस राहिलो थोडा नॉर्मल झालो आणि मग पुन्हा अभ्यास सुरू केला कोल्हापूरचे मित्र हरीष आणि अमर माझ्या हॉस्टेलवर रहायला आले मी सावरलो होतो. नंतर मला चांगले मार्क मिळाले ...प्राध्यापक झालो ...पण तो क्षण आवरण्यासाठी महेश नसता तर कदाचित आज मी प्राध्यापक होऊ शकलो नसतो…  करिअरची दिशा बदलली असती परंतु माझ्या स्वप्नातील प्रोफेशन मी पूर्ण झालं नसतं तर कदाचित आज मी इतका नैसर्गिकपणे जगत आहे तर कदाचित मी जगू शकलो नसतो... म्हणूनच महेश च्या वाढदिवसानिमित्त ही घटना आवर्जून आठवली .


अशीच एक महत्वपूर्ण घटना  2015 रोजी योगायोगाने महेश 25 मार्च रोजी आंबेडला होळीनिमित्त आला होता गायत्री ..प्रकाश ..जयश्री.. होते.. सरप्राईज वाढदिवस साजरा झाला आणि मग नात्यातील मैत्री कायम एकत्र राहण्यासाठी... जीवदानी परिवाराची याच दिवशी स्थापना झाली आज जवळजवळ तीस .. बत्तीस लोक आर्थिक सुरक्षितते पासून भावनिक आणि मानसिक आधाराची भक्कम विश्वास असणारी जीवदानी सारखी व्यवस्था करायला सुद्धा महेश महत्त्वपूर्ण घटक आहे लोकांचं म्हणणं माझ्यापर्यंत आणण्याचं महेश नेहमीच काम करत असतो कारण त्याला माहित आहे की, मी एकदा एखादं ठरवलं की हट्टाने पूर्ण करण्याचं ...मग मागेपुढे बघत नाही .. मग माणसं दुखावली जातात ..  मला कोणी मागे वाईट बोलू नये म्हणून महेश सतत माझ्याशी भांडत असतो चांगलं करण्याचं सोडून दे.. अगोदर तुझ्याबद्दल कोणाला गैरसमज होऊ नये हे लक्षात घे..  पण माझं वेगळंच असतं चांगलं काम करण्यासाठी मला कोणी वाईट म्हटलं तरी चालतं … पण ते काम झालं पाहिजे यामध्ये आम्हा दोघांमध्ये कायमच वाद होत असतात पण या वादात सुद्धा प्रचंड आपुलकीचा ओलावा असतो. असा भक्कम पाठिंबा असणारा भाऊ आयुष्यात असणे माझ्या भाग्याचं लक्षण आहे. असेच प्रेम राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...