सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

विजय आंबेकर..राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी

विजय आंबेकर : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी

●प्रा. आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

31 ऑगस्ट 2020

-----------------------------------------------



एक सामान्य घरातील तरुण ...

चाळीमध्ये राहून शिक्षण घेत...

उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणारी लोकवस्ती …

भाईगिरी करणे भुषण समजणाऱ्या तरुणांच्या वस्तीत राहणारा तरुण...

आईवडीलांकडून उत्तम संस्कार घेत ...

पोलीस कॉन्स्टेबलची नोकरीची सुरवात करत …

क्राइम ब्रँच मध्ये जबरदस्त नेटवर्क आणि अमोघ संवाद कौशल्याच्या जोरावर मोठमोठे गुन्हाचा तपास करणारा हुकमी  एक्का...

विजय साळसकर सारख्या नामवंत 

पोलीस अधिकारांची पहिली पसंत असणारा मुंबई पोलीस ...

अपार मेहनतीने अभ्यासकरून पोलीस सब इन्स्पेक्टरच्या पदापर्यंत मजल मारूनही तृप्त नहोता अविरत कष्ट करणाऱ्या  पोलीस अधिकाऱ्याला 2017 मध्ये  मुंबई पोलीस खात्यातील उत्तुंग कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होतो …

अमिताभ बच्चनच्या एखाद्या चित्रपटाची कथा असावी असे  हिरोचे वर्णन … वाटते ना ..

पण हा आहे आमचा विजयदादा ...बघा नाव सुद्धा अमिताभ बच्चनच्या चित्रपटाला साजेसंच आहे. 

विजयदादा म्हणजे तसा नात्याने चुलता ..

पण पहिल्या पासूनच त्याला आम्ही दादाच हाक मारतो … सार्वजनिक कार्यक्रमात अतिशय दुर्मिळ दिसणारा भाऊ ...पण वहिनी भेटायचीच दोघेही सतत हसतमुख ..त्यांच्या दोन कन्या निशा आणि सोनिया.

राजाराम आजोबाची मुलं म्हणजे अतिशय शिस्तबद्ध 

आंबेकर भावकीतील अतिशय श्रद्धेने नांव घ्यावी त्यातील राजाराम आजोबा ...

आणि त्यांचा सर्वात लहान मुलगा म्हणजे विजयदादा ...उंचपुरे व्यक्तिमत्व ..साऊथच्या हिरोंसारखी झुपकेदार मिशी ...पण चेहऱ्यावर सतत खळखळून असणारे हास्य …कधी मुंबई पोलीस वाटायचाच नाही ...या त्याच्या साऊथ हिरो सारख्या पर्सनॅलिटीचा त्यांच्या कामात खूप उपयोग झाला … मुंबईतील घाटकोपरच्या हमीदाबाई गल्लीत राहत असताना शेजारी ब्रीद काकांच्या प्रोत्साहनामुळे विजय दादा पोलीसभरती झाला ...प्रवास खडतर होता ...कधी कधी ट्रेनिंग सोडून यावं का ?..असे वाटायचे पण मनात खुप मोठी स्वप्न असल्याने तिथे मिळणारे प्रत्येक ट्रेनिंग जीवनबोध म्हणून घेतले आणि नोकरी सुरू केली...

20 व्या वर्षे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सुरुवात...

थोड्याच वर्षामध्ये त्याची बदली क्राइम ब्रँच मध्ये झाली आणि गेली 20 वर्षे त्यांच्या पर्सनॅलिटीचा पुरेपूर उपयोग झाला …

दादा गावी आला की एकतर पुस्तक वाचत बसायचा किंवा दुसऱ्याशी साधं बोलताना सुद्धा भारावून टाकणारे बोलायचा

हयाच त्याच्या स्वभावाचा क्राइम ब्रँच मध्ये उपयोग झाला. जगामध्ये मुंबई पोलीस अग्रेसर मानले जातात 

त्यांच्या गुन्हे तपासाची मुख्य किल्ली आहेत 'खबरी' ...आणि विजय दादाची हीच स्ट्रेंथ आहे. त्याच्या नेटवर्कचा अनेक पोलीस अधिकारी कौशल्यपुर्वक उपयोग करायचे. म्हणूनच प्रफुल्ल भोसले असतील महेश देसाई असतील की 26/11 फेम शहीद विजय साळसकर असतील या सर्वांना विजयदादाच्या नेटवर्कचा गुन्हे तपास करताना खूप उपयोग व्हायचा 

..दादांनी साधे कपडे घातले की साऊथच्या हिरोंसारखा दिसायचा आणि प्रचंड वाचन असल्याने बोलायला लागला की विचारवंत वाटायचा त्यामुळे पोलीस तपासाला खुप उपयोग व्हायचा .  पण रक्तातच मुंबई पोलीस असल्याने जातायेता कुठे अन्याय होत असेल तर तो शांत बसायचा नाही ...कधी कधी जीवावर बेतायच … हिरोसारख्या पर्सनॅलिटीचा अश्यावेळी धोका असायचा ...

असाच एक किस्सा …

घराच्या गल्लीतून बाहेर पडून रस्त्यावरून चालत जात होता …एका भिकाऱ्याला काही भाईगिरी करणारी मुलं त्रास देत होती ...विजयदादांनी त्या पोरांना हटकवल आणि पळवून लावलं ...तो पोलीस आहे असं कोणाच्याच लक्ष्यात आलं नाही ...मग पुढे जाऊन रिक्षा केली आणि पुढच्या कामावर जायला निघाला… रिक्षा दुसऱ्याच मार्गावर जातेय असं त्याच्या लक्षात यायच्या अगोदरच भिकाऱ्याला त्रास देणाऱ्या पोरांनी आपली गँग घेऊन दादाला घेरलं होतं… रिक्षावाला पण त्यांचाच माणूस होता ..दादाला मारायला पुर्ण तयारी झाली होती ...मग दादाने आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवली ...आपण क्राइमब्रँचला आहोत हे दाखवून दिलं 

..ती उदयमुख भाई वरमले ….पण तिथून बाहेर आल्यावर क्राइम ब्रँचचा हिसका दाखवत आयुष्य भरासाठी नरमले …

1995 च्या दरम्यान मुंबई पोलिसांनी सगळ्याच गुन्हेगारीच्या गँग संपवून टाकण्यासाठी एन्काऊंटरच्या घटना घडल्या होत्या ..   त्याकाळात घरामध्ये खुप तणावाचे वातावरण असायचं घरातून बाहेर पडलेला दादा घरी आला म्हणजे आपला... अशी कायम भीती असायची त्याकाळात कुटुंबातील कुठल्याच सार्वजनीक लग्न ..समारंभ..याला कधीच दिसायचा नाही ...सर्व कार्यक्रमात वहिनी एकट्याने हजर असायची ..मग नातेवाईक विचारायचे विजय कुठे आहे .. मग वहिनी हसूनच विषय टाळायची ...पण त्या हसण्यात पण मुंबई पोलिसांनी उभारलेल्या गुन्हेगारी मोहिमेची वास्तव भीती लपलेली असायची..  


पण दादा कधी संतुष्ट राहिला नाही ...मुंबई पोलीस म्हणून गुलशन कुमार हत्याकांड सारख्या अनेक गुन्हे तपासात दादाच्या कुशल नेटवर्कचा खूप फायदा झाला वेळोवेळी खात्याकडून जवळजवळ 400 च्या आसपास उत्तम कामासाठी प्रशस्तिपत्र प्राप्त झाली आहेत.पण कधीच त्याचा गवगवा केला नाही की बडेजाव केला नाही...माझी मुंबई विद्यापीठातील कामाचा दादाला नेहमी अभिमान वाटतो …,अगदी सद्या सुरू केलेल्या लिखाणाला दादाने स्वतः फोन करून कौतुक केले दादाच्या व्यस्त दिनक्रमात सुद्धा त्यांच्या बॅगेत कायम एखादं पुस्तक असतंच अश्या उत्तम वाचक दादांनी जे वाक्य बोलला ते कायम लक्षात राहील ...पुलं आणि वपु च्या स्टाईलसारख तुझं लिखाण आहे ...असचं निरीक्षण ठेवत जा म्हणजे आपोआप लिहीत राहशील ...मला तर मूठभर मांस चढलं … खरं म्हणजे मला दादाचा युट्यूबवर व्हीडिओ  करायचा आहे … बघूया कधी वेळ येते ती …



व्यस्त शेड्युल मध्ये सुदधा सब इन्स्पेक्टर व्हायचं म्हणून अभ्यास करायचा ...पण पुरेसा वेळ नमिळाल्यामुळे त्याला यशस्वी होता आलं नव्हतं … 2015 मध्ये दादाचा 50 वा वाढदिवस होता ..पण अजिबात साजरा नकरता अभ्यास करत राहिला कारण दुसऱ्याच दिवशी परीक्षा होती … आणि शेवटी 2015 साली त्याच्या आयुष्यात दोन महत्वाच्या घटना घडल्या ...एक स्वतः पोलीस सब इंस्पेक्टर झाला आणि...त्याच्या मोठ्या मुलीने निशाने लॉ पूर्ण करून हाय कोर्टात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली.

 दादाने केलेल्या कामाची सर्टिफिकेट आणि पेपर कात्रण यांच्या संचायाची दादाने कधीच प्रयत्न केला नाही.

एकदा एक पोलीस ऑफिसर वहिनीला म्हणाले विजयच इतकं पराकोटीच काम आहे तर एकत्र करा शेवटी निशा आणि वहिनीने जबाबदारी घेतली इतके वर्षे पॅशनने केलेल्या कामाबद्दल दादाला पहिल्याच प्रस्तावात 2017 ला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला….आणि आम्हा आंबेकर फॅमिलीला अभिमान रहावा अशी आयुष्यभरासाठी भेट दिली.


मराठी विद्यालय घाटकोपरच्या शाळेच्या मित्रांनी सत्कार ठेवला दादा फक्त 12 मिनिटच बोलला त्यात आई बाबा...वहिनी …. निशा .. सोनिया यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणलं ... संपूर्ण आयुष्य त्यागाची भावना ठेऊन ...कायमच जीव धोक्यात घालून मुंबई पोलीसाचे कर्तव्य पार पाडत राहिला ...पण समाधानाचे उत्तुंग शिखर सुद्धा गाठलं होत ….ते समाधान फक्त दादाचं नव्हतं … घरातील सर्व माणसांच होतं...शाळेतील मित्रांना होतं ...सोमय्या कॉलेजच्या मित्राचं होतं… आमच्या सारख्या भावाचं होत ...आज त्याच्या सर्व्हिसला 37 वर्षे होत आहेत ..पुढच्या वर्षी रिटायर्ड होणार ...पण त्याच्याकडे बघून वाटतच नाही की दादाची सर्व्हिस संपत आली आहे

दादा तुला मानाचा सलाम...





गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

भाई ते भाई ते भाई...एक जन्म तीन आयुष्य

भाई ते भाई ते भाई ...एक जन्म तीन आयुष्य


● प्रा.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

 20 डिसेंबर 2020

________________________



  आंबेडला एकत्र कुटुंब असल्याने सख्ख.. चुलत असा  भेदभाव कधी समजलाच नाही आणि मोठ्या माणसांचे व्यवहार अगदी सख्ख्या सारखे असले  तर  अजिबातच समजत नाही ..भाई मोठ्या काकांचा दोन नंबरचा मुलगा ... पण कधी चुलत भाऊ वाटलाच नाही त्याच्या मोठ्या भावाला भाऊ म्हणायचं आणि याला भाई म्हणायचं ...माझी मोठी बहीण आणि तो जवळपास एका वयाचे असल्याने त्याचा आदरच असायचा... मुळात भाई हा कलाकार स्वभावाचा माणूस लहानपणापासून त्याची पेंटिंग्स मी बघत आलो आहे ..इतके अप्रतिम असायच्या की आम्ही फॅन होतो त्याचे  गणपती आले की भाई हवाच असायचा कारण त्याच्या डोक्यातून अतिशय कल्पकतेने दरवर्षी नव्या पद्धतीची डेकोरेशन साकार व्हायची… भाई रत्नागिरीत हॉस्टेल मध्ये शिकायला होता ….रत्नागिरी 30 किलोमीटर अंतरावर असलेले शहर पण आमच्यासाठी खूप लांबवर असल्यासारखं वाटायचं ….सगळ्यांनाच लहानपणी एखाद्या घराचे ….प्रवासाचे अंतर खूप मोठे वाटतात ...तसेच आम्हाला वाटायचे ….कालांतराने तेच अंतर किती छोटसं आहे  असे वाटायचे...वडील पहिल्यापासून ट्रिप काढण्यात एक्सपर्ट लहान मुलांना सोबत घ्यायचे ...एखाद-दुसरा शिक्षक सोबत असायचा ….त्यावेळी आम्ही अतिशय छोटुकले दुसरीत असु…. आमची सर्कस बघायला ट्रीप करायची ठरलं ...रात्री उशीर झाला की भाईच्या शाळेत रहायचं ...भाई दहावीला शिवाजी हायस्कूलला होता…. त्याने त्यावेळेच्या वॉर्डनला पटवून आमचे एका रूम मध्ये राहण्याची व्यवस्था केली … त्यामुळे भाई आम्हाला खुप मोठा वाटायचा ...आंबेड मध्ये भाईची ओळख चांगल्या क्रिकेटर म्हणून होती ...अनिल आणि सुनील दोघेही त्यांना मोहल्ल्यातील लोकांना खेळायला हवे असायचे ...उक्षी ...कुरधुंडा... मध्ये ट्रॉफी असायच्या त्यावेळेला सुनील आणि अनिल त्यांच्या सोबत असायचे... त्या वयातील मुलाना ते दोघे हवेसे  वाटायचे

 ….असा हा आमचा पहिला भाई कुटुंबवत्सल कलाकार आणि मित्रांचा मित्र 

...आता दुसरा टप्पा सुरू म्हणजे मुंबईत गेल्यावर... जॉब आरे डेअरीमध्ये  लागला ...मुंबईतील चाकरमानी गावी एस टी च्या प्रवासातून  थकलेले ...आंबलेले चेहरे करून बाहेर पडायचे ...आप्पा (मोठे काका)असतील तर अर्धा दिवस फक्त प्रवास कसा झाला याच्याच गप्पा असायच्या ...पण भाईला  मातीची ओढ कायम असायची आणि मग तो आला की,आम्ही त्यांच्या मागे  मागे फिरायचं 

….अचानक एकदा घरात एकदम स्मशान शांतता झाली  कोणीतरी माणूस जात तसं  घरात वातावरण होतं ..आई पहिल्यापासूनच आम्ही लहान जरी असलो तरी सगळे मनातून बोलायची समजून सांगायची ...आमचे भावविश्व समृद्ध करायची ही तिची खासियत ...तिच्याकडूनच कळलं की भाईला अटक झाली आहे … पोलिसांनी पकडले  आहे कारण त्याच्या हातून अपराध  झाला होता ….असं कळल्यावर आम्हाला असं वाटलं ..असं होऊ शकत नाही ….भाईसारखा माणूस असं करू शकत नाही …काही वर्षांनंतर भाई गावी आला ...पण त्याचं बसण्याचे ठिकाण आमच्या घरात कमी असायचं समोरच्या काकांच्या घरात कुठल्यातरी कोपऱ्यात बसलेला असायचा...आमची उत्सुकता असायची... परंतु भाई  खूप कमी बोलायचा... लोकांमध्ये खूप कमी वावरायचा…. आणि नंतर लक्षात आलं की दिवस दिवस तो दारू पिऊन असायचा …. आई खूप समजवायची ...पण आमच्यासमोर आईने त्याच्याबद्दल कधीच वाईट इमेज तयार केली नाही …

 इथे दुसऱ्या भाईचा जन्म झाला होता ….

गणपतीचे डेकोरेशन करणे .. पेंटिंग काढणे त्यांनी पूर्णपणे बंद केलं होतं ….एकटाच रहात असल्याचे दिसायचे त्याला खूप वाईट सवयी लागल्या होत्या…

 जगात काही वाईट नाही .. पण पोरांनो चांगल्या संगतीत राहूनच चांगलं होतं ...अशी आई बोलायची ..पण आमचे अण्णा प्रॅक्टिकल कामात रस ...भाई आंबेडला आलेला असताना ...भाईला म्हणलाने या भिंतीवर चित्र रंगव ..., हे घे रंग आणले आहेत ...आमच्या घराच्या भिंतीवर शंकराचे चित्र आणि एक सरस्वतीचे चित्र खूप चांगल्या पद्धतीने रेखाटलेले आठवते ….हळू हळू मुंबईत नाकारलेल्या भाईला गावी सन्मान मिळू लागला ...पेवेकर भाऊ खुप आदर करायचे…  त्यांच्यामध्ये आत्मविश्वास तयार होत होता ... थोड्या दिवसांनी अण्णा आणि आईने त्याचे लग्न करायचं ठरवलं भाई म्हणाला तुम्ही सांगाल तसे होईल आणि त्यांनी एका अतिशय साध्या स्वभावाच्या मुलीशी लग्न झाल्यावर   तिसरा भाई  जन्माला आला ...हळू कुटुंबवत्सल व्हायला लागला त्याचा भुतकाळ सोडू लागला आणि मुख्य प्रवाहात आल्यावर वेगळाच भाई दिसू लागला ... मला लिहिता येतं की नाही ते मला माहिती नव्हतं परंतु भाईला मी म्हणायचो तुझ्यावर एक पुस्तक लिहायचं आहे … भाई एक असं चुंबकीय व्यक्तिमत्व आहे  ….त्याच्याबद्दल खूप आपुलकी आणि आपलेपणा वाटतो … मी कॉलेजला आल्यानंतर मी भाईला म्हटलं मी इलेक्शनला उभा राहत आहे …  भाई म्हणाला असल्या फालतू गोष्टीत पडू नकोस... त्यातूनच भानगडी सुरू होतात …  गोरेगावच्या सगळ्या कॉलेजला केवळ माझं नाव सांगून पोर निवडणूकीत निवडून येतात ... मी म्हटलं मला तसं काहीच करायचं नाही ….खूप चांगलं काम करायचा अनुभव घ्यायचा आहे. असा हा भाई मला वाईट अनुभव येऊ नयेत म्हणून काळजी घ्यायचा.

आमच्यावर  सामाजिक संस्कार होते त्यामुळेच पुढें भाई सामाजिक... राजकीय क्षेत्रात अग्रेसर असायचा…. झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम जोरात सुरू झाल्यावर लोकांना  समजून सांगाने  ..तोंडाने समजून सांगायचं … नाही समजला तर  भाई स्टाईल होतीच … पण कोणाचे वाईट केले नाही ... गोरेगाव स्टेशन जवळ एकदम हुकमत आहे  ...पण आश्चर्याची गोष्ट साध्या साध्या लोकांच्याही मनाचा विचार करणारा भाई फेव्हरेट आहे…  झोपडपट्टी पुनर्वसन मध्ये सगळी लोकं नवीन रूममध्ये राहायला गेले ... पण भाईने आपला जुना रूम सर्वात शेवटी सोडला …. 2004 मध्ये आंबेडमध्ये महापुरुष मंदिराचे  नूतनीकरण करायचं ठरलं त्यावेळेला मी आंबेड जीर्णोद्धार अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली होती ... आपल्याला मंदिराला दोन ते तीन लाखाचे सामान  म्हणजे ..मार्बल ...लादी ..जैन मंदिरासारखे कोरीव खांब असे एक टेम्पोभरून  सामने पाठवून दिले होते ...पण भाईने कधीच त्याचा गवगवा केला नाही …. हजार रुपये देणारा माणूस सुद्धा पुढे पुढे करत होता परंतु भाई स्टेजवरती कधी आला नाही असा हा आमचा तिसरा भाई सगळ्यांना हवा हवासा वाटतो.

पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 



बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

सनी आंबेकर ...बेधडक व्यक्तिमत्त्व

सनी आंबेकर... बेधडक व्यक्तिमत्त्व


प्रा.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

19 ऑगस्ट 2020

________________________________________




एखादया फिल्ममध्ये 14 वर्षाचा हिरो बांधकाम क्षेत्रात एखादया बिल्डरकडे काम करत असतो कष्ट करत असतो ...पण नोकरी त्याला केवळ काम शिकून घेण्यासाठी करायची असते मग हिरो नोकरी सोडून देतो

मोठं होण्यासाठी मोठं मोठ्या लोकांच्या सानिध्यात रहायला सुरुवात करतो  ...कारण त्यांच्या मनात कायम स्वतः बॉस व्हायचं असतं ...मग यासाठी 20 वर्षानंतर स्वतः बांधकाम कंपनी स्थापन करतो … ज्यालोकांच्या इथे नोकर म्हणून काम करतो तिथे स्वतःच्या कष्ठाने त्यांच्या सोबत बिझनेस पार्टनर म्हणून काम करायला सुरुवात करतो. ….वाटला की नाही एखादा अभिताभ बच्चनची फिल्म बघत आहात. ...पण ही फिल्म नाही फिल्म सारखं जीवन जगणाऱ्या सामान्य घरातील असामान्य स्वप्न पाहणाऱ्या सनी आंबेकरची स्टोरी आहे 

वडिलांचा जॉब सरकारी ...पण सतत बदलीचा असल्याने बारा गावचं पाणी पिऊन खूप लहान वयातच मोठा झालेला सनी …

माझं कॉलेज संपून एम ए साठी कोल्हापूर येथे शिकण्यासाठी जाण्याची माझी धडपड सुरू होती तोपर्यंत कर्ल्यात सुनीलदादाकडे रहात होतो ...तर हे महाशय देसाई हायस्कुलमध्ये शिकण्यासाठी थिबा पॅलेस घाटातून चालत जायचे ...पण धड कुठे ...बॉस असल्यासारखं समवयस्क पोरांवर दादागिरी करत जायचे ...पण वडीलधाऱ्या व्यक्तीशी कायमच आदराने पण मित्रासारखे वागायचे ...एकदम बिनधास्त स्वारी ...कसली तमा नाही ...चिंता नाही ….पण नेहमी काहीतरी वेगळं करण्याच्या थाटात असायचा. शिकण्याच्या नावाने बोंब असायची ..पण दुसऱ्याला शिकवण्यात अग्रेसर असायचे यामुळे अनेकांना उर्मट वाटायचा ...अजूनही वाटतो ...पण माझं रिडींग एखादा व्यक्ती कर्तृत्ववान असेल तर त्याच्यासाठी सनी कधीही काहीही करायला तयार असतो ...पण कर्तृत्ववान आहोत असं कोणी त्याच्यासमोर भासवायचा प्रयत्न केला की ...हा गेला त्यांच्या अंगावर ...मग शांत बस म्हटलं तरी गप्प बसणार नाही.

काही काळ राजकारणात स्वतःला अजमायचा प्रयत्न केला ...पण त्याच्या स्वतःच लक्षात आलं की आपल्या सारख्या देधडक माणसाचं इथे काम काम नाही ...आणि स्वतःच थांबला आणि स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली ...पण त्यांचे भाई जठार ...सुदेश मयेकर यांच्या बद्दल त्याच्या मनात खूप आदर आहे. आणि कधीही या दोघांनी हाक मारली की, सनी नाही बोलू शकत नाही … 

वरकरणी तापट वाटणारा सनी भावना विवष होऊन रडतानाही ही मी पाहिला आहे … त्याच्या आईचा विषय आला की खूप हळवा होतो तिचा मृत्यु तो आजही पचऊ शकला नाही. ...आणि मग सहज डोळ्यातून त्यांच्या अश्रू यायला सुरुवात होते ….कोणतीतरी खंत असते ती त्याला सतत बोचत असते … आणि मग हलवा होतो

शाम आंबेकर हे एक अजब व्यतिमत्व होत... शामच त्याच्या सख्याभावाशी सुदधा कधी सूर जमले नाहीत पण सनीसोबत दिवस दिवस त्यांच्याकडे येऊन रहायचा ...या दोघांमध्ये एक कॉमन धागा म्हणजे ….मोठी मोठी सामाजिक स्वप्न बघणे ….पण लोकांच्या डोक्याच्या वरून यायचं 

शाम अचानक हार्ड अटॅक आला आणि आम्हाला सोडून गेला तेव्हा सनीची अवस्था अतीशय बिकट होती …..एव्हढा भावना विवष व्यक्ती आज तागायत व्यक्ती पाहिला नाही ... त्यांची भावना विवष अवस्था बघून त्याची पत्नी सानिका मी सोबत जावं म्हणून विनवणी करत होती ...केवळ सनीला सांभाळण्यासाठीच मी शामच्या प्रेताला सोबत गेलो होतो.. 

सनीच्या इमोशनला आधार देण्याचं कारण सुद्धा तसच होत ...माझी मोठी बहीणीचा मृत्यु झाला तेव्हा मी खुप खचलो होतो ...आणि भाचीच्या लग्नाची जबाबदारी होती … प्रीतीची अवस्था बघून खूप वाईट वाटतं होतं

...आणि प्रीतीचे लग्न ठरलं ...सनीने मग माईच्या घराचे नूतनीकरण करणं करायचं ठरवलं ...आणि जोकाही धडाका लावला ….माईच घर कोणालाच ओळखता येणार नाही असं अप्रतिम केलं ….आणि ते पण प्रीतीची हलदकाढणी नवीन घरात करायची हा त्याने केलेला पण पूर्ण केला ….कोण एव्हढं कोणासाठी करत ...स्वतःची काम सोडून आवडत्या व्यक्तीसाठी जीवाच रान करणारा सनी …..हा माझ्या आयुष्यात एकमेव आहे ...म्हणूनच त्यांचे स्थान माझ्या आयुष्यात खुप महत्वाचे आहे …. त्याची सर्व स्वप्न पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना 



मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

उल्हास सप्रे ...एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती

उल्हास सप्रे ...एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती


● प्रा.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

18 ऑगस्ट 2020

----------------------------------------------------




उल्हास म्हणजे ...1993 पासून सतत समोर येणारी व्यक्ती ...मित्र आणि वेगवेगळ्या जबाबदारीतून येणारं व्यक्तिमत्व ...सुरुवात झाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयमध्ये आमच्या दोघांच्या स्वभावामध्ये जमीन आसमानाचा फरक परंतु अनेक ठिकाणी आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर  असायचो … तुम्हाला आश्चर्य वाटेल असा किस्सा सांगतो  सुरुवात झाली 1994 कॉलेजच्या  सांस्कृतिक महोत्सवमध्ये  याचा सहभाग …. 1993 म्हणजे  गेल्यावर्षी ग्यादरिंग बंद ...इलेक्शन बंद ...मग महाविद्यालयाने विद्यापीठांच्या नियमानुसार सांस्कृतिक महोत्सव करायचे ठरवले …. काय मजा नव्हती कारण महोत्सव होता दिवसाचा आणि आमचं ग्यादरिंग व्हायचं रात्रीचं इलेक्शन नसल्यामुळे नेतृत्व मानायची पद्धत संपली होती ….तरीही ही काही ग्रुप करून सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे ठरले हेमंत वणजू आणि काही सायन्स ग्रुपनी महाविद्यालयामध्ये पहिल्यांदाच पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट आयोजित करत होते कॉलेजच्या मुलांना ही स्पर्धा कशी असते तेही माहित नव्हतं ...त्यांना स्पर्धक मिळत नव्हते... एफ वाय ला असताना 1993 ला मी  विद्यार्थी प्रतिनिधी होतो त्यामुळे मुलांना एकत्र करून नियोजन करणं हे नेहमीच झाले होतं. पर्सनॅलिटी कॉन्टॅस्टचे आयोजकांपैकी धावत पळत महाराजा ग्रुपच्या कट्ट्यावर आला आणि म्हणाला आम्हाला स्पर्धक मिळत नाहीयेत तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता का ? मी म्हटलं आम्ही कोणत्या अँगलनी पर्सनॅलिटी कॉन्टॅक्टमध्ये सहभागी होऊ शकतो असं वाटतं …, पण  दैवत काय ऐकायला तयार नव्हता ...तो म्हणतोय तर उतरायचं ...दैवत कोणत्या भावनेने स्पर्धेत उभा राहिला हे त्याचं त्यालाच माहिती ...पण मी  मित्र आहेत तर आपण पण जायचं असआपलं सूत्र... 22 नंबर हॉलमध्ये गेल्यावरती पाहिलं तर उल्हास हिरवा शर्ट त्याच्यावरती पांढरा शुभ्र टाय घालून उभा होता

….नाकासमोर जाणारा मित्र इथे कसा काय ? 

अशाप्रकारे बऱ्याच वेळेला अंदाज येत नाही की उल्हास हा नेमका कुठे जाऊ शकतो. 

 मी 1999 कॉलेज मध्ये गोगटे कॉलेजला प्राध्यापक म्हणून  रुजू झालो आणि त्याच दरम्यान जीजीपीएस मध्ये शिक्षक म्हणून उल्हास रुजू  झाला अगदी संस्थेचा लाईफ मेम्बर झाला काही वर्षानी बघतोय तर हा प्राणी आमच्या BMS च्या वर्गात शिकवायला ...

नाही बाबा हा उल्हास काही करू शकतो….

थोड्या दिवसांनी ऐकलं तर याने जीपीएस सुद्धा सोडलं आणि मुकुल माधव च्या शाळेमध्ये हजर झाला 

त्यानंतर ऐकलं तीही शाळा त्यांनी सोडली आणि 

माने इंटरनॅशनल स्कूल मध्ये हजर झाला 

आज तो तिथेच प्राचार्य म्हणून काम करत आहे अभिमान वाटतो त्याचा …

अशाप्रकारे उल्हासशी बोलणं व्हायचं परंतु त्यांची अनेक ठिकाणी अशी अचानक उपस्थिती दिसायची आणि अचंबित करायचा ...

असचं एकदा रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये समाजवादी लोकांचा एक मोठा राष्ट्रीय विचार मंच भेटीला आला होता... अभिजीत हेगशेट्ये हे त्याच्यामधील सक्रिय कार्यकर्ते … तिथे जाऊन पाहिलं तर उल्हास तिथे हजर  मला मोठं आश्चर्य वाटलं कारण उल्हास प्राचार्य देव  यांचा भाचा आणि एकदम समाजवादी … थोडं कोडं पडलं पण अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितलं उल्हास सप्रे खूप जुने कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे काम सुद्धा खूप छान आहे ..मी मनात म्हटलं असू शकतो  कारण हा प्राणी 1993 पासून असेच धक्के देत आहे ..हा माणूस काय करू शकतो काही सांगता येत नाही 

95 मध्ये आल्यानंतर हा माणूस बऱ्याच वेळी समाजवादी विचारांच्या पोस्ट टाकायचा मग मी त्याला व्यक्तिगत समजवल हा मित्रांचा ग्रूप आहे आपले इथे विचार प्रकट न केलेल बरं... तो शांत बसला पण काही लोकांनी त्याला टार्गेट केलं आणि तो कंटाळून ग्रुप मधून बाहेर पडला सविस्तर भेटलो आणि त्याला समजावलं  विचार... संघटना ... खूप झाल्या आता. एक मित्र म्हणून  चांगले संघटन असायला पाहिजे आणि प्रत्येकाने आपले व्यक्तिगत संघटन नक्की जपावं पण 95 मध्ये  फक्त मित्र असावा. आंबा ट्रिपमुळे उल्हास एवढा फेवरेट झाला की ...त्यांच्या व्यक्तीमत्वाची खुप पैलू दिसायला लागले आहेत.

एक मिश्किल उल्हास ….

एक खवय्या उल्हास….

95 मध्ये अनेक वेळेला वैचारिक मतभेद झाले की

ऊत्तम भूमिका ठाम भूमिका घेतो  …

 ... असा हा उल्हास आज त्याचा वाढदिवस आहे त्याच्या स्वतंत्र विचारसरणीच्या स्वभावाला आयुष्यभर त्याने जपावं ….

अश्या या अनमोल मित्राला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!


अण्णा ....दूरदृष्टी बाप

अण्णा …. दूरदृष्टी बाप


● प्रा.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

7020737400

18 ऑगस्ट 2020

-----------------------------------------------------

-----------------------------------------------------

   आज वडिलांचा आठवा स्मृती दिन आहे

------------------------------------------------------

अण्णा..प्राथमिक शिक्षक ...म्हणजे खरं म्हणजे चाकोरीबद्ध जीवन असलं पाहिजे होतं… बदली होणार जॉब … स्वतःच कुटुंब आणि शाळा असं सर्रास प्राथमिक शिक्षकांचे जीवन असतं….

पण सर्वांचे वडील जसे असतात तसे माझे वडील का

 नाही ? असा प्रश्न नेहमी पडायचा ?  

सतत मोठ-मोठ्या योजना आखायचे …. 

सतत लोकांमध्ये असायचे …. 

सतत त्यागाची तयार असायची  …. 

मग आमची फरफट व्हायची... 

आमच्या सर्वच कल्पनेच्या पलीकडचे असायचे.

अण्णांनी हातात घेतलेलं एखादं काम लोकांच्या लक्षात यायचं की नाही... माहीत नसायचं ...पण मास्तर(प्राथमिक शिक्षक होते) बोलताय ना ? मग आपण सोबत आहोत ...असं अनेकवेळा व्हायचं.

...पण कधी लोक न्यूट्रल व्हायचे तेव्हा अण्णांची चिडचिड व्हायची...लहानपणी आमच्या समजण्याच्या पलिकडे असायचे. 

...पण आज माझ्यासंदर्भात सुद्धा असं होतं तेव्हा कळतं (रक्ताचे गुण असतातच ना... )

 अण्णा असे का वागायचे...

त्यांची व्हिजन काय होती...

 त्यांनी सुरू केलेली प्रत्येक व्यवस्था आज लोकांच्या हिताची ठरत आहे. लोक आवर्जून अण्णांची आठवण काढतात ...आणि म्हणतात मास्तर होते म्हणून हे सर्व आज आहे.

 वडिलांना बाबा कधीच म्हटलं नाही ...कारण आमचे चुलत भाऊ अण्णा म्हणायचे म्हणून आम्हीपण अण्णाच म्हणायचो 

वडील कधी केवळ घरचे झाले नाहीत ...कारण शाळेचे शिक्षक असल्याने अख्या गावाचे (आंबेड) आंबेकर गुरुजी.

एकदा तर शाळाच घरात आणली ….

किस्सा एकदम फिल्म होईल असाच आहे. (1983) सालातील प्रसंग ….

शाळेची इमारत जुनी झाली होती … आम्ही शाळेच्या भिंतीजवळ बसायचो कारण भिंती चिऱ्याच्या होत्या पण आरपार होल होते.. त्यामुळे होलमधून मुंबई-गोवा हाय-वे वरील येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसायच्या 

आणि मोठी सुट्टीपडून शाळेत आलो की त्याच होलमधे साप बसलेले असायचे ….इतकी जरजर अवस्था शाळेची झाली होती.

घरात अचानक नवीन घर बांधायचा विषय सुरू झाला 

…. मी चुणचुणीत असल्याने बिनधास्त अण्णांना बोललो आम्ही नाही येणार नवीन घरात …आमचं मूळ घर भलमोठं आहे ...एकूण 20 दरवाजे आहेत.. ते पण चिरेबंदी…. 

पडवीत तर आम्ही क्रिकेट खेळायचो आणि पकडापकडी …त्यामुळे नवीन घरात जायचं नाही असं सांगितलं …. नवीन घर झालं ….आणि थोड्या दिवसांत आमच्याच नवीन घरात 4 थीचा आमचा वर्ग सुरू झाला. आणि 6 वी मध्ये असताना परत नवीन शाळेच्या खोलीमध्ये आमचा वर्ग सुरू झाला

परत काही दिवसांत नवीन घरातुन आम्ही परत जुन्या घरात रहायला आलो … 

….हा सर्व उलटसुलट शाळेचा प्रवास का झाला ? 

घराची अदलाबदल कश्यासाठी झाली त्यावेळी लहान वयात समजलं नव्हतं पण नंतर कळलं …

अण्णांना शाळेचं नवीन काम करायचं होतं..

त्यामध्ये अण्णांची धडपड लोकांना कळत नव्हती कळेपर्यंत आमची शाळेचा लपंडाव सुरू होता.

अण्णा म्हणजे लक्षात न येणार कोडं असायचं….

त्यातच त्यांची दूरदृष्टी होती.

किस्सा असा होता ...आंबेडची शाळा पडायला आली होती म्हणून शाळेजवळची जागा घेऊन अजून दोन वर्गाची शाळा बांधायला घेतली ...पण सगळीकडेच विघ्नसंतोषी लोक असतात त्यामुळे शाळेचे काम अर्धवट थांबलं ...सामान तर आले होते ...आणि अण्णांच्या सर्व अंगलट आले होते...म्हणून त्याच सामानातून नवीन घर झाले होते. एवढी मोठी आपत्ती ...मनस्ताप झाला होता त्यावेळी लहानपणी कळलं नव्हतं म्हणूनच नवीन घर बांधताना मी नापसंती व्यक्त केली होती ….परंतु चांगलं काम करण्यासाठी चांगली माणसं सुद्धा जोमाने मदतीला येतात त्यावेळी अतिशय सन्मानित व्यक्ती आणि आदराचे स्थान असणारे हसन खान ..नारायण गुरव ... मोहम्मद शिरगावकर ..धोंडू आंबेकर या लोकांनी अण्णांना योग्य साथ दिली आणि नवीन शाळेचे काम सुरू झाले होते. म्हणूनच नवीन शाळा झाल्यावर आम्ही नवीन शाळेत गेलो होतो. ….पण परत जुन्या घरात रहायला का आलो ?  ….याचं असं झालं होतं की शाळेला निवेंडकर गुरुजी म्हणून नवीन मुख्याध्यापक आले होते अतिशय वक्तशीर आणि हुशार शिक्षक होते त्यांच्या बद्दल अण्णांना आदर होता आणि स्वतः एक वर्षानंतर मुख्याध्यापक म्हणून बदली होऊन जाणार होते म्हणून आपल्या नंतर शाळा सांभाळून घेणारा माणूस आपल्या जवळ असावा म्हणून नवीन घर त्यांना रहायला दिलं आणि स्वतः जुन्या घरात रहायला आलो ...आणि अण्णांच्या दूरदृष्टी मुळे तसेच झाले पुढील आठ वर्षं निवेंडकर गुरुजी आमच्या घरी राहिले ...आणि शाळेला चांगले दिवस आले ...शाळा 'केंद्र शाळा' झाली ..

आम्ही नवीन घरात रहायला होतो तरी जुन्या घरातील 11 भावांचा गणपती महोत्सवसाठी स्वतः झटायचे 2005 नंतर सर्व हिशोब करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली म्हणून आज आम्ही सख्ये चुलत 21 भाऊ एकत्र आहोत.. अण्णा गेल्यानंतर घर दुरुस्तीचा विषय आला तेव्हा केवळ 15 दिवसात 7 लाख रुपये सर्वांचे जमले आणि केवळ 4 महिन्यात घराचे काम पूर्ण झाले ...आम्ही 21भाऊ त्यांच्या सारखे एकत्र रहावेत म्हणून त्यांनीच पाया भरून ठेवला होता...ही अण्णांची दूरदृष्टी होती.

अण्णांची मी सातवीत असतांनाच 140 किलोमीटर लांब सापिर्ली - खेड मध्ये शाळेत प्रमोशन होऊन मुख्याध्यापक म्हणून बदली झाली होती . पाच सहा वर्षे राहिले 

...तिथेपण जिवाभावाची माणस तयार केली. एकदा स्वाती देवळेकर(उर्फ बेबी म्हणजे माझी दोन नंबरची बहीण) ट्रेझरी ऑफिसमध्ये खेड मध्ये बदली होऊन आली... एक वयोवृद्ध बाई स्वतःच्या सुनेसाठी पेन्शनचे काम करायला आली होती तिचा मुलगा मिलिट्री मध्ये शहीद झाला होता. ट्रेझरीचा शिपाई बहिणीला म्हणाला..  वर्ष झालं ह्या म्हातारीच पेन्शनच काम कोण करत नाही ..बिचारी अतिशय आडगावातून येते...दिवसातून दोनच गाड्या अश्या सापिर्ली गावातून येतात ...बेबीला सापीर्ली गावाचं नांव ऐकलं आणि अण्णांच्या शाळेचं गांव म्हणून तिच्याबद्दल आपुलकी तयार झाली . त्याबाईच तासाभरात काम करून दिलं.. काम झालं म्हणून त्या बाईला अश्रू अनावर झाले ..तरुण मुलगा शहीद झाल्याचं दुःख होतच … मग बेबीने.. "मी आंबेकर गुरुजींची मुलगी" म्हणून सांगितले. मग ती बाई अण्णांबद्दल भरभरून बोलू लागली ...देव माणूस होता ..पोरांना चांगली शिस्त लावली होती म्हणूनच मुलगा मिलिटरीमध्ये गेला होता असे आवर्जून सांगितले. 

ती बाई बाहेर गेली आणि थोड्या वेळाने वडापाव घेऊन आली….आणि म्हणाली बाई मला माहित आहे...हाफीसच काम झालं की हाफीसर पैसे घेतात ..पण तू आंबेकर गुरुजींची मुलगी आहेस तू पैसे घेणार नाहीस म्हणून वडापाव आणला आहे..  नको म्हणू नकोस.

बेबीच्या डोळ्यात पाणी आलं होतं ...पण मनात वडीलांच्या संस्काराबद्दल अभिमान होता.


अक्षय कुमारचा  टॉलेट सिनेमा पाहिला ...त्यामध्ये त्याला झालेला विरोध बघून अण्णांची आठवण आली होती 1984 साली सार्वजनिक शासकीय योजना टॉलेट

बांधायची योजना आली ...अण्णा शिक्षक असले तरी सर्व शासकीय आणि राजकीय कामात अग्रेसर असायचे ...संगमेश्वर तालुक्यातील सर्व राजकीय /शासकीय मीटिंग आमच्याच घरी असायच्या.. आमदार भाई सावंत खाजदार हुसेन दलवाई ...आमदार मुसा मोडक ...आमदार मामी भुवड ...अगदी आमदार सुभाष बने आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने सुदधा …   ही सर्व मंडळी घरी यायची निवणुका हा विषय कमी होता पण शासकीय योजना कश्या राबवायच्या याबद्दल मोठं प्लॅनिंग असायचं ...त्यावेळी शासकीय स्तरावर स्वच्छता आणि आरोग्यासाठी सार्वजनिक संडास बांधायची योजना आली ...म्हणजे लोकांच्या उत्सुकतेचा भाग होता ... त्याचा मैला टाकीत सोडायचा हा विषय आला आणि कळीचा विषय सुरू झाला त्याची दुर्गंधी येणार अश्या भीती पोटी गावात कोणीच तयार नव्हते…. तो वापरायचा कसा ...स्वच्छ कसा करायचा … याबद्दल सर्वच अनभिज्ञ होते …जर संडास झाला तर आजूबाजूच्या घरात वास येणार अशी अफवा पसरली ..मग अण्णांनी तोडगा काढलाया आणि म्हणाले "माझ्या घराच्या शेजारीच बांधा" ….मग काही बायका आईच्या कानात खुसपूस करू लागल्या ….जरा मास्तराला समजवा ...पण आईचा अण्णांना पाठींबा असायचा म्हणूनच पुढे 1992 ला आई पंचायत समिती निवडणूक जिंकून आली होती (शिवसेनेची लाट असून सुद्धा ...त्यानंतर वांद्री मतदार संघात कॉंग्रेस कधीच निवडून आले नाही) आईपण लोकांना समजावू लागली संडास असणे आपल्या बाईमाणसांना किती महत्वाचे आहे.. सर्व बायका तयार झाल्या आणि शेवटी आमच्या घराच्या शेजारी गावचा पहिला सार्वजनिक संडास तयार झाला .सांडसाच्या साफसफाई साठी खुपच मेहनत घ्यावी लागायची.. त्यासाठी आमच्याच वाडीत राहणारे अतिशय मोजकं बोलणारे पण आदराचे स्थान असणारे माडखोलकर गुरुजी मदत करायचे अण्णांना सामाजिक काम करण्यासाठी कोणीना कोणी सोबत हवं असायचे. माडखोलकर गुरुजीं सिंधुदुर्गचे पण त्यांना सुद्धा आमच्या घराच्या शेजारी स्वतंत्र घर भाड्याने घेऊन दिले होते त्यामुळे त्यांचीही सहकार्य व्हायचे ...हळूहळू लोकं सज्ञान झाली ...इथेही अण्णांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते.


1988 मध्ये गावात टेलिफोन सेंटर असावं म्हणून लोकांच्या घरा-घरात फिरून जागृती केली ...गावातील पहिला टेलिफोन केळकर पोलीस पाटलाचा आणि दुसरा  आमच्या घरी आला … शेजारीच मुस्लिम मोहल्ला असल्याने मस्कत,दुईत (गल्फ) मधून आलेले फोन सांगायला मोहल्यात आम्ही लहान मुलं जायचो... मग परत त्यांचा फोन येईपर्यंत त्यांच्या गप्पा सुरु असायच्या.. आपुलकीने विचारपूस व्हायची ...मुळातच हिंदू-मुस्लिम असे दोन धर्म आहेत हे आम्हाला लहानपणी माहीतच नव्हतं ...कारण गौरी-गणपतीला..  मोहल्यातील खान फॅमिली,आंबेडकर फॅमिली, केळकर फॅमिली,फकीर फॅमिली, शिरगांवकर फॅमिली ,बोट फॅमिली यांचे दरवर्षी नवसाचे नारळ असायचे आणि आम्ही सुद्धा उरूस असायचा तेव्हा दर्ग्यात अण्णांसोबत नारळ घेऊन जायचो … होळीला आम्ही एकत्र आट्यापाट्या खेळ खेळायचो ..   टेलिफोन आल्याने आम्ही फोनच्या निमित्ताने वारंवार भेटायला लागलो.

गावात सर्व लोकांनी एकत्रित शेतीची कामे करावीत म्हणून अण्णा नेहमी पुढाकार घायचे.. मोहल्ला, मोहिते वाडी, किंजळे वाडी, आणि आंबेकर वाडी यांची सर्वांची बैलाची जोत एकत्रित यायची ...आणि सकाळी इरल्यात बसून न्यारी आणि दुपारी कपड्यात घेऊन आलेलं जेवण खायचं… सगळ अविस्मरणीय होतं ...शेतात गाण्यांची जोरदार मैफिल असायची ….जणू एक सणच असायचा … पण अण्णांनंतर असं गावचं एकत्रित दर्शन मुश्किल झालं होतं... 

मी जेव्हा रत्नागिरीत मित्रांचे ग्रुप करून काम करतो तेव्हा अण्णा खुष असायचे.  1994 ला शिर्डी येथे मी ट्रिप आयोजित केली तेव्हा गावावरून जात असल्याने 53 जणांना कांदा पोहे आणि चहा आईचे सकाळी 7 वाजता करून ठेवले होते त्या ट्रिपला असलेले सर्व मित्र आजही आठवण करतात .

          (सर्व जाती धर्म ...एकत्र आणण्याचे कार्य)

12 मध्ये मी आणि गौरी(माझी पत्नी) घरी(नाचण्यात) 5 मे ला लग्नाचा 10 वा लग्नाचा वाढदिवस एकत्रित करायचा म्हणून मुंबईत महेश (लहान भाऊ)ला फोन सुरू होता आणि अचानक गावातुन (आंबेड) फोन आला ...आई घाबरली होती ...ती म्हणाली अण्णां कसेतरी करत आहेत...7 दिवसांपूर्वीच आईला बरं नव्हतं म्हणून हॉस्पिटलमधून आणलं होतं आणि आई गावी गेली होती .. अण्णांना बरं वाटत नाही यावर विश्वास बसत नव्हता ….लगेच गावी जाऊन रत्नागिरी सिव्हीलमध्ये गौरी असल्याने दाखल केले पण … 

अण्णांना ब्रेन अटॅक आला होता दुसऱ्याच दिवशी मुंबईत जसलोक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो…त्यासाठी बिपीन शिवलकरने खुप मदत केली होती सोबत माजी विद्यार्थी अभिजित मांजरेकर होता...खेडमध्ये देवळेकर भाऊ ...नंतर जसलोक मध्ये दिपू ...बिपिटी हॉस्पिटलमध्ये  पूर्वा..आणि पुढे जवजवळ 4 महिने अण्णा कोमात होते ….सर्व वाडीतील लोक भेटून गेले आयुष्यभर बडबड करणारे अण्णा काहीच बोलत नव्हते ...हे बघवत नव्हतं... अण्णांच वय 78 होते पण त्या वयात सुद्धा कोणाचा जन्म कधी झाला आणि कोणाचा मृत्यु कधी झाला या तारखा घरातील लोक विसरले की, अण्णांना  विचारायचे ...इतकी प्रत्येकाबद्दल आपुलकी होती .. 18 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 7 वाजता अण्णां गेले असा मला फोन आला..  मी पोहचेपर्यंत रात्री 9 वाजले ज्यावेळी बीपीटी हॉस्पिटल क्वॉर्टर मधून अण्णांचा शेवटचा प्रवास सुरु झाला तेव्हा जवळजवळ 1 किलो मिटर लोकांची गर्दी होती ….एखाद्या  खेडेगावात राहणारा शिक्षक... त्यांच्या अंतिम दर्शनासाठी एव्हढी गर्दी म्हणजे नक्कीच अण्णांच्या सामाजिक कामाची सलामी होती.

अण्णांची आठवण कायम शाळेत रहावी म्हणून त्याचं महिण्यात आंबेडच्या शाळेला सेंट्रल साउंड सिस्टीम बसून दिली आणि अण्णांच्या सामाजिक कामाला पुढे नेण्याचा प्रारंभ केला.

                    (लग्नाचा 50 वा वाढदिवस)

या वर्षी 18 (ऑगस्ट) अण्णांचा 8 वा स्मृतीदिन आहे आम्ही चार भावंडाच्या कुटुंबांनी एकत्रित येऊन अण्णां आणि आईच्या सामाजिक कामाचा वारसा पुढे जावा म्हणून  " पारिजात फाऊंडेशन " ची स्थापना करत आहोत ….मोठी बहीण हयात नाही पण दोन मुली दिप्ती(मुंबई येथे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स), प्रीती(इंटरनॅशनल स्कुल मध्ये शिक्षिका)आणि दोन जावई ...निलेश कादवडकर (मुंबई -व्यावसायिक आणि भाजपा तालुका अध्यक्ष)आणि प्रशांत नेवरेकर(वेब डीझायनर) ...दोन नंबर बहीण ट्रेझरी मध्ये अधिकारी, तिचे पती RDCबँकेत मॅनेजर विशेष म्हणजे 60 जणांचा स्वामी भक्त म्हणून उत्तम ग्रुप चालवता त्याचे दोन मुलगे एक धीरज HDFC बँकेत मॅनेजर सौरभ आपलं कोकण न्यूज चॅनेल मध्ये जॉब करतो,माझी मिसेस मेंटल हॉस्पिटलमध्ये नर्स, लहान भाऊ महेश MSEB मध्ये मॅनेजर (बांद्रा) विशेष म्हणजे 4500 सभासद असलेल्या पतसंस्थेवर संचालक म्हणून निवडून आला आहे त्यांची पत्नी पूर्वा BPT हॉस्पिटलमध्ये नर्स  अश्या सर्वाना एकत्र घेऊन पारिजात फौंडेशन च्या माध्यमातून सामाजिक काम करून अण्णांच्या सामाजिक कामाचा वारसा पुढे चालवायला आहे,  5 वर्षांपूर्वीच जीवदानी परिवाराची स्थापना करून दर सहा महिन्यांने चिंतन शिबिराच्या माध्यमातून आम्ही एकत्र यायला सुरुवात केली आहेच त्यामुळे पारिजात फौंडेशन संकल्पना उदयास येत आहे ...आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आवश्यक आहेत.

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

बापू गवाणकर -समर्पित व्यक्तिमत्त्व

बापू ....समर्पित व्यक्तिमत्त्व


प्रा.आनंद आंबेकर

●गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

१ ऑगष्ट २०२०

-------------------------------------------------




💐💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐


मी 1990-91 ते 19995-96 गोगटे कॉलेजचा विद्यार्थी

1999 ते आज तागायत गोगटे कॉलेजमध्ये प्राध्यापक

या काळात बापू कधी सोबत नव्हता 

असा विचार करून सुद्धा सापडणार नाही

मी प्राध्यापक आणि बापू ऑफिसचा माणूस 

ही खरी आमची पगारी ओळख 

..पण या व्यतिरिक्त कामातच आम्ही दोघे जास्त बिझी 

बापू कॉलेजच्या मॅनेजमेंट(सर्व) मध्ये ...

मी कॉलेजच्या इव्हेंट मॅनेजमेंट (फक्त) मध्ये 

…...केवळ हाच आमच्या दोघातील कॉमन फॅक्टर 

काम आणि त्यातील समर्पन हे मी बापू कडे बघून बघून पचवतो ...हा समर्पन पचवावच लागत ...नाहीतर सगळीकडेच बोंब 

सर्वात महत्त्वाचे प्रिया (बापूची पत्नी) … बापूच्या समर्पनाला प्रियाची साथ नसेल तर दोलायमान स्थिती झाली असती ...काही दिवसांपूर्वीच अनुष्काने (बापूच्या मुलगी) SSC ला 97% मार्क मिळून दोघांनाही आयुष्यभराच खूप मोठं समाधान दिलं ….आवर्जून बापूने फोन करून सांगितले यांचा आनंद खुप झाला. 



आनंदात सहभागी करून घेण्याचा मनाचा मोठेपणा बापूचा नेहमीचा स्वभाव. नवीन गाडी घेताना आम्ही अनेक मित्र सोबत होतो ….घर घेताना तर आम्ही 3 वर्ष रत्नागिरी पालथी घातली ...शेवटी आम्ही दोघे नाचण्यात एकाच ठिकाणी रहायला आलो.बापूला गाड्यांची विशेष आवड असल्याने चांगली गाडी दिसली की लहान मूलांसारखा त्या गाडी सोबत फोटो काढणार 

म्हणूनच मी 10 वर्षांनी लहान असून सुद्धा त्यांच्या सोबत मित्रासारखा राहू शकतो ...मनातील सर्व शेअर करू शकतो...



 

काळजी घेणारा माणूस सर्वांचीच काळजी घेत असतो ...समर्पित असणारा व्यक्ती सगळीकडेच समर्पित असतो कारण त्याचा तो स्थायी स्वभाव असतो. 

बापू त्याला अपवाद नाही. 

कॉलेजमध्ये जितका बापू आपला वाटतो तितकाच त्याच्या कॉलेज मित्रांसोबत सोबत सुद्धा बापू घरचा वाटतो. कोणत्याही मित्राला बर नसेल तर बापू तिथे हजर असतोच ….इतकंच काय कोल्हापूर ...पुणेमध्ये जाताना स्वतः ड्रायव्हिंग करून जाणार 

म्हणूनच बापू जेव्हा  डेंगूने आजारी होता तेव्हा डेरवण हॉस्पिटलमध्ये लोकांची मोठी रांग लागली होती 

बापूला रक्त देता आलं नाही म्हणून वाईट वाटून घेणारे मित्र होते ….कारण बापूसाठी रक्त देणारे भरपूर झाले होते.  माणसं कमविण्याची कला बापूकडे अफलातुन आहे. लोकांच्या प्रसंगात धावून जाण्यासाठी बापूची एक सिस्टीमच बनवलेली आहे. 



बापूच्या आयुष्यातील आदराचे स्थान म्हणजे अरुअप्पा जोशी 1995 ते 2008 पर्यंत अप्पांच्या प्रत्येक नियोजनात बापू नाही असं कधीच झालं नाही 

कॉलेजचा विकासाचा विषय असेल ….कुसुमताई पतसंस्था काढायची असेल ...भाजप पक्ष विस्तार असेल… सगळीकडे अप्पाच्या सोबत बापू असायचाच 

म्हणूनच 2008 नंतर बापूच्या कामात हक्काचं ….आदराचं स्थान गमावल्या सारखं कायम त्याला वाटत असतं. पण तरीही संस्था म्हणून कोणीही अधिकारात व्यक्ती आला तर बापू सोबत असतोच हीच त्याच्या कामातील समर्पित वृत्ती दिसून येते.



बापूचे आणखीन एक विशेष कौशल्य म्हणजे त्याचे लिखाण कर्माने क्लार्क परंतु स्वभाव धर्माने कलाकार म्हणूनच नाटक ..संगीत ..यामध्ये कायमच रमणारा स्वतःच्या काळबादेवी गावाच्या अनुभवाची लेखणी सर्वानाच भावते ...विषेश भंडारी भाषेतील त्याचं लिखाण आपलंसं करत ….
वस्त्रहरणचे लेखक गंगाराम गवाणकर त्याचे नातेवाईक असल्याने त्यांच्या सोबत राहण्याची संधी बापूमुळे मिळाली होती. काही वर्षापूर्वी अखिल भारतीय साहित्य संघ ,पुणे कडून पुरस्कार मिळाला तेव्हा मलातरी खुप आनंद झाला होता ….आणि मुंबई विद्यापीठाच्या शिक्षकेतर पुरस्काराने बापूला सन्मानित केले तेव्हा समाधान झाले होते.


बापूला कधीकधी मतलबी माणसं भेटतात तेव्हा नाराज असतो ...पण नाराजी सुद्धा त्या मतलबी व्यक्तीच्या आयुष्यात वाईट दिवस येतील तेव्हा त्यांच्यासोबत कोण असणार या काळजी पोटी असते … 

म्हणूनच मी सुद्धा माझ्यावर असे प्रसंग आले की बापूकडे मन हलकं करायला जातो. 

असाच एक प्रसंग …2013 साली 

माझ्या मोठया बहिणीच्या घराचा प्रश्न होता 

बापूला सहज बोललो भावजीनी मला विश्वासात घेतलं असत तर मोठा प्रसंग टळला असता (घराच्या व्यवहारातच भावजीची ठेथ झाली होती ) सर्वच जबाबदारी माझ्यावर आली होती ..एकीकडे पोलीस तपास ...दुसरीकडे बहिणीची तब्बेत ….तिसरीकडे घराच्या परवानगीचा प्रश्न ...मन सैरभैर झाले होते 

बापू म्हणाला आपण संपाला बोलू ...संपा म्हणजे नाचणे गावचं आदराच व्यक्तिमत्त्व म्हणजेच संतोष सावंत 

आम्ही गेलो ...संतोषनी मलाच वेड्यात काढलं अगोदर का आला नाहीस ...म्हटलं भावजीनीच मला विश्वासात घेतलं नाही तर तुला मी काय सांगणार …

भावजी अनेक बड्या लोकांकडे जाऊन आले होते 

..पण घोळ काही सुटत नव्हता 

बापू म्हणला झालं ते झालं आता आनंद टेन्शनमध्ये आहे त्याच्यावर सर्व जबाबदारी आली आहे ...म्हणून मी आलोय 

...संतोषनी लक्ष दिल्यावर सर्व गोष्टी सुरळीत झाल्या 

या दोघाच्या मैत्रीमुळे मला रिलॅक्स होता आलं होतं 

माझ्या दोन्ही भाच्या  म्हणतात मामा तू होतास म्हणून आज आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला येऊ शकतो ….पण बापू नसता तर संतोषनी लक्ष दिलं नसतं आणि संतोषनी मनापासून लक्ष दिलं नसतं तर आज हक्काचं घर मिळालं नसतं बापूच्या या मनापासून मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे माझ्यासारखे किमान शेकडो लोकं तरी निर्धास्त आपले प्रश्न त्याच्यासमोर घेऊन जाऊन बापू आपले स्वतःचे वैयक्तिक संबंध मध्ये घालून लोकांचे प्रश्न सोडवत असतो अशा समर्पित बापूला  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!


मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...